Friday, March 18, 2011

कधीतरी अशीच एक
संध्याकाळ असेल ,
ह्रदयात तूझी प्रीत
अन ओठावर गीत असेल ..
नकळत मग गालावर
या थेंब ओघळतील ...
कधीतरी पून्हा
तू स्वप्नात येशील ,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला
जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...
प्रीत आठवून माझी कंठ
तूझाही दाटेल ...
डोळ्यातील अश्रू मूक पणे
गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते
मी जवळ नसेन .....

No comments:

Post a Comment