Friday, April 29, 2011

कुणा दुसऱ्या मुलीच्या नजरेला नजर
द्यायलाही आता भीती वाटते
कुणाच्या नजरेतल प्रेम पाहून
माझ्या प्रेमात मलाच उणीव वाटते

तू दिलेल्या विरहाच्या अग्नीत
मी अगदी होरपळून गेलो आहे
तुझ्या आठवणीच्या वादळात आता
सरवस्व झोकून दिल आहे

प्रिया जाता जाता येवढच करून जा
माझ्या प्रेमातली उणीव मला सांगून जा
उणीव संगीतलीस तर,
परत कुणाच्या प्रेमात तरी पडणार नाही
ती उणीव शोधण्यासाठी आयुष्यभर झुरणार तर नाही

मरेपर्यंत दोन दिवस कधीच विसरणार नाही
पहिला म्हणजे तू हो बोललेला ज्यांनी
माझ आयुष्याच पालटून गेल,.. आणि
दुसरा म्हणजे तू निघून गेलेला ज्यांनी
आयुष्यभर तुझ्या बरोबर जगण्याच माझ स्वप्न
अखेर संपून गेलं...........

सांजवेळ झाली की प्रत्येक पक्षी आपापल्या घरट्याकडे जातो
दावणीच सोडलेलं वासरू गाईच्या ओटीतच विसावतो
तस माझ मन किती काही केल तरी सावरत नाही
तुझ्या आठवणीशिवाय त्याला काहीच सुचत नाही

जातेस तर जा पण जाता जाता येढच कर तू
दिलेल्या आयुष्य भराच्या दुखातल थोडस दुख कमी कर
ते तेव्हाच कमी होईल फक्त .......
मी शेवटचा निरोपघेण्या आधी त्याच ,,,,,
प्रेमळ नजरेनी मला तुझ्या डोळ्यासमोर धर .........

आता फक्त येवढच कर ,,,
तेव्हा तरी नजर चुकवू नकोस
कारण मी जाणार असेन

मी जात असताना येवढच कर

मनतले अश्रू मनात सुकू देऊ नकोस
त्यांना डोळ्यातून वाहुदे.....
मरता मरता का होईना
माझ्या प्रियाला माझ्यासाठी रडताना पाहूदे....

मरता मरता का होईना
माझ्या प्रियाला माझ्यासाठी रडताना पाहूदे....

Wednesday, April 6, 2011


गजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!
निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी तू रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!
कळी कळी वेचतांना तू फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी
आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!
तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!
असे हे किती दिवस चालायच,
मुकेपणातच बोलायच सारे
संकेत कळून सुध्दा न कळल्यागत
करायच अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!
आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?
लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

हि सुखाची घडी, वाटे फुलांची लडी,
श्वास श्वासांत उसळे रोमाचांची सरी...

हि नवी सांज अण चंद्रकोर नविशी,
हि नवी स्व्पनेही वाटती हवीशी...

ना कुणी भोवती, तरी भास भांबावती,

कि कुणी ऐकतो, जे मी बोलते स्वतःशी...

जागेपणी स्वप्न हे वाटते नकोसे,
हृदयात का हे वाढती उसासे...

हा ध्यास कोणता घेतला मनाने,
जुने स्वप्न पुन्हा उलगडे नव्याने...

का पुन्हा जागे ओढ, त्या जुन्या वाटेची,
वाटते गुणगुणावे ते जुने तराने...

हलके भासे शरीर कापसाप्रमाणे,
उडण्याचे होती भास, नभ वाटती ठेंगणे...

पण तरी अंतरी, वाटते का भीती,
होतील का हि पुरी स्वप्ने जी भाबडी
माझ्याकडे पाहात जेंव्हा
शांत निघून जातेस,
अश्रू भरल्या डोळ्यानीच
सर्व सांगून जातेस,
माझ्या प्रेमाची उणीव तुला
सतत भासवत राहील
काही क्षण का होईना पण
माझी आठवण येत राहील,
माझ सोड काही नाही
तू स्वताला जपत जा
रोज रात्री स्वप्नात मात्र
एकदा तरी येत जा,
मी आता जगतोय खरा पण
फक्त खोट्या आशेवर
तू येशील म्हणून आणखीन हि उभा आहे
तुझ्या त्याच परतीच्या वाटेवर ..........

Friday, April 1, 2011

एक होता चिमना आणि एक होती चिमणी
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार
तरीही एकमेकांचे जिवलग यार.

वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .

चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित,
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत

रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना

एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले

त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते

कानाहीह्याची बरीच कारणे सांगितली
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात नाही पटली

चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना

चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला

चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता

चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले

एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते

पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते ...


प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत
विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत
मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत
कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित
कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत

तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना
नात्यांच भान ठेवाव लागत
समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत
२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत

येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात
कधी वाटत मुलगी होण पाप का?


आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?
मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या?

एक कविता लिहीन म्हणतो,

शब्दांमध्ये मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी

रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण
..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण
..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके

चार आण्यांचा फुटला कप,

त्याला बाराआण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही
,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही
.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं
,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं
..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट
..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट
.
त्याला पडताना सावरणारी
,
तो चुकला की कावणारी
..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी
..
एक कविता लिहीन म्हणतो
,
शब्दांमध्ये मावणारी
..

माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप
..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप
.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट
..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट
.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं
..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न
...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न
.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं
?
जड जायला लागतो रोज ताटातला घास
..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास
.
परिस्थितीच्या वादळात

जिद्दीचं पीक लावणारी
..
शिवारभर ओसंडत त्याच्या नवसाला पावणारी
,
एक कविता लिहीन म्हणतो
,
शब्दांमध्ये मावणारी
..
पुढा-यांच्या डोळ्यांवरती हव्यासाचे पडदे
..
धर्मांधांच्या गोळ्यांखाली माणुसकीचे मुडदे
..
अमका पक्ष... तमकी सभा
,
कापाकापीला पूर्ण मुभा
..
दादांना भाईंना मंत्र्याचे छत्र
..
हप्तावसुलीला शिफारस-पत्र
.
सामान्य माणुस
?
बिशाद काय त्याची
?
रस्त्यात मेला तरी खातंय का कुत्रं
?
त्याच्या कष्टाचा पडलाय रे भाव
.
ऐतखाऊ भ्रष्टांचे शिजताहेत डाव
..
कावेबाज लांडग्याचे दिल्लीपर्यंत हात
..
फळली नाही दिल्ली तर, साला दुबईको जाव
...
मग शतमुखांचा शेष होऊन

खलांच्या टाळूस चावणारी
,
हातांमधल्या मशालींतून
क्रांतीची आग लावणारी
..
एल्गाराचा घोष बनून
नसानसांतून धावणारी
..
एक कविता लिहीन म्हणतो
,
शब्दांमध्ये मावणारी...